कोरोनाची लेखरं..
1. मुलीची मैत्रीण अचानक भेटली, 'शाळा नाही तर मज्जा आहे ना?' विचारले तशी नाराज होऊन उत्तरली 'नाही ना काकू, पूर्वी बाबा ऑफिस ला जायचे तर आई आणि आम्ही भावंडं खूप मज्जा करायचो.आता बाबा सारखेच घरी, चार महिने झाले अम्ही हासलोच नाही'.
2. नेहमीच्या कारपेंटर चा फोन आला 'मै वापस आ गया हू, कोई काम हो तो बताना'. आणि मन विचारते झाले, 'लॉक डाऊन सुरू झाल्यावर साधारण पहिल्या चवदा (१४) पंधरा (१५) दिवसातच काम नाही हाल होतात म्हणत महाराष्ट्राच्या नावाने बोटे मोडत सरकारच्या आणि सोनू च्या मेहेरबानिवर फुकट गावी गेलेले लोक, चार (४) महिने हाताला काम नसताना परत येणाऱ्या गाडीचे तिकीट स्वतः काढून कसे परतले? ते ही दुष्ट महाराष्ट्रात??'
3. मोदी सर म्हणाले, लॉक डाऊन मध्ये कोणाला कामावरून काढू नका, त्यांना पगार न कापता पोहोचता करा. सगळ्यांनी त्यांचे म्हणणे मान्य केले. एक दिवस मैत्रिणीचा फोन आला ' ती तुझ्याकडे काम करणारी मुलगी आहे ना, तिने आमच्या सोसायटी समोर भाजीची गाडी टाकली आहे. धो धो चालते. चिक्कार गर्दी असते तिच्याकडे. घर कामापेक्षा ह्याच्यात जास्त पैसे आहेत सांगत होती, आता हेच काम करेल म्हणाली' ... 'काय सांगतेस?, कालच खूप रडत होती, फार हाल आहेत म्हणाली म्हणून पुढच्या दोन (२) महिन्यांच्या पण पगार आगाऊ देऊन टाकला मी तिला'.
4.'आरे दादा, तू तुझ्या ड्रायव्हर ला काढून टाकलेस का?' 'नाही रे, अशावेळेस कोण काढेल रे, घरात एकटा कामावणारा तो, बरोब्बर एक (१) तारखेला सगळा पगार देतो त्याला. घरात थोडी काटकसर करतो पण कामवाल्यांचा पगार आधी द्यायचा असे आम्ही दोघांनी ठरवलं आहे.'
'आरे, पण त्याने माझ्या कुरिअर कंपनीशी एक(१) वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट केले आहे. पूर्वीची नोकरी सोडली, असे सांगितले. आज त्याचा दुसरा पगार झाला'.
- स्वाती आवटी दीक्षित
No comments:
Post a Comment