कालचा लोकसत्ता ..
लोकसत्ता प्रतिनिधीला समजत नाहीये की समजून घ्यायचे नाही आहे?
प्रश्न परीक्षा सोप्पी घेण्याचा नाही आहे. प्रश्न न शिकवल्या गेलेल्या अभ्यासक्रमाचा आहे, मुलांच्या तब्येतीचा आहे.
मुळात जवळ जवळ संपूर्ण एक वर्ष सगळ्या प्रदूषणापासून लांब, घरातल्या सुरक्षित वातावरणात मुले होती. अशा वेळी प्रतिकारशक्ती नाजूक झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुलांच्या बाबतीत पालकांचे मन असेही हळवे असते. साधा सर्दी ताप असेल तरी पालक सहजच म्हणतात, काय व्हायचे असेल ते आपल्याला होवो, मुलांना काही व्हायला नको.
अशात हा जीवघेणा कोरोना , पालकांचे धाबे दणाणणारच.
त्यात संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला गेलेला नाही. गणित, संस्कृत सारखे विषय ऑनलाईन शिकवून सगळ्यांनाच समजतील अशातला भाग नाही. एकदा २५% अभ्यासक्रम वगळला जातो, एकदा प्रश्नसूची मध्ये परत टाकला जातो. सहामाही आणि चाचणी परीक्षा ऑनलाईन झाल्या. त्यामुळे मुलांनी संगणकावर वेळेत पेपर लिहिण्याचा सराव सुरू केला. तर आता मूळ परीक्षा ऑफलाईन घेणार ची सूचना आली. वर्षभर लिखाण सुटलेले, लिखनाचा वेग कमी झालेला, परत लिखाणाचा सराव सुरू केला. ह्या सगळ्या गोंधळाचा मुलांच्या मनावर किती आणि काय परिणाम होत असेल ह्याची कल्पना आहे का लोकसत्ता प्रतिनिधीला?? केवळ पंधरा (१५) वर्षे वयाची मुले आहेत ही, ह्या वयात नैराश्य, रक्तदाब कमी जास्त होणे ह्या समस्यांना तोंड देत आहेत. गम्मत वाटते का तुम्हाला सगळी?
प्रतिनिधी लिहितात आणि संपादक छापतात? त्यांनाही ४/५ मुलांशी बोलून वस्तुस्थिती काय आहे हे माहीत करून घ्यावेसे वाटत नाही?
'अभ्यासपूर्ण पत्रकारिता' नावाचा एक प्रकार असतो. माहिती करून घ्या जरा त्याची. तुम्हाला अभ्यास न करता बातम्या छापायची सवय झाली आहे म्हणजे सगळ्यांनाच त्याची लागण झाली असेल असे समजता की काय तुम्ही? सुदैवाने विद्यार्थी अजूनही अभ्यास करूनच परीक्षा देतात. त्यामुळे असेल कदाचित त्यांच्या समस्येची नाळ तुम्हाला समजली नसावी.
लोकसत्ता वर्तमानपत्र, त्याचे प्रतिनिधी आणि संपादकांचा निषेध !!!
#लोकसत्ता #वर्तमानपत्र #बातमी
No comments:
Post a Comment