मिशन १० वी,१२वी ...
(काळजी आणि गोंधळ)
पूर्वी- इयत्ता दहावीला चांगले गुण मिळाले की शास्त्र शाखेला प्रवेश मिळत असे.
हल्ली- हे सगळे संदर्भ मोडकळीस आलेले आहेत.
शहरी भागात- इयत्ता दहावीला चांगले गुण मिळाले की चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळतो.
उर्वरित महाराष्ट्रात- शास्त्र, वाणिज्य, कला शाखेचे एक-एकच महाविद्यालय असते. त्यामुळे प्रवेश मिळणे महत्वाचे. चांगले वाईट भविष्य आपापल्या मेहेनतीवर आणि अभ्यासावर अवलंबून असते.
थोडक्यात इयत्ता दहावी (१०वी) च्या बोर्डाच्या परीक्षेचे महत्व काय राहिले तर शून्य ... केवळ मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर सारख्या हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या शहरांच्या समस्येपायी अख्खा महाराष्ट्र वेठीस धराल?
पूर्वी- इयत्ता बारावी च्या गुणांवर डॉक्टर इंजिनियर होता येत असे.
हल्ली- प्रवेश परिक्षेतील उत्तम कामगिरी शिवाय कुठेही प्रवेश मिळत नाही. बोर्डाच्या मार्कांनी विशेष फरक पडत नाही.
असे असतानाही दहावी, बारावीची (ऑफलाईन) परीक्षा घेण्याचा अट्टाहास का? कधी आपण काळाची पावले ओळखणार?
गेल्या वर्षभरात शिवाजी विद्यापीठाने तीन वेळा काही परीक्षा रहीत केल्या. एवढे मोठे विद्यापीठ , इतके जुने .... तरीही ऑनलाईन परीक्षांचा पर्याय सोडून परीक्षा रहीत करते? जर विद्यापीठेच काळाच्या मागे असतील, तर ते काय मुलांना आजच्या काळातले शिक्षण देणार?? आणि ह्या अशा विद्यापीठातून शिक्षण घेतलेली मुले काय जगाच्या नकाशावर आपले कर्तृत्व सिद्ध करणार ?
तरी सुद्धा विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात चमकत आहेत, म्हणजे त्यांना पारंपारिक शिक्षणाव्यतिरिक्त इतर शिक्षण पद्धतींचा आधार घ्यावा लागत असणार. ह्याचाच अर्थ आपली शिक्षण पद्धती अपयशी ठरते. अशा अपयशी शिक्षण पद्धती साठी आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालून त्यांना परीक्षेला बसवावे का?
की दहावी आणि बारावी च्या अर्थशून्य परीक्षांचे ओझे झुगारून त्यांना निरोगी आयुष्याचा आशीर्वाद देऊन आयुष्याची परीक्षा द्यायला जगाच्या शाळेत पाठवावे??
- एक दहावीच्या विद्यार्थिनीची गोंधळलेली आई
#इयत्तादहावी #इयत्ताबारावी #शिक्षणमंत्री #CMOMaharashtra
No comments:
Post a Comment