सोय पहातो
तो सोयरा ..
आज बोलता बोलता अचानक एका गृहस्थांची गाडी घसरली 'काँग्रेस चे सरकार असते तर इतका गोंधळ झालाच नसता'. काँग्रेसचेच सरकार आहे, सरकार मध्ये सेना, राष्ट्रवादी बरोबर काँग्रेस पण आहे हे जेव्हा लक्षात आणून दिले तेव्हा सारवासारवी करताना गाडी अचानक 'ही सगळी मोदींची चूक आहे' म्हणून केंद्रावर घसरली.
माझे अपयश झाकायला मी दुसऱ्याकडे बोट दाखवले की झाले, असे काहीसे झाले आहे सध्या लोकांचे. लोकांचे सोडाच पण सेनेच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे पण असेच काहीसे झाले आहे. इतके वर्ष भाजपा बरोबर खांद्याला खांदा लावून काम करायची इतकी सवय झाली होती आणि आता भाजपा त्यांच्या बरोबर नाहीये तर 'भाजपा वाले काही करत नाहीत' म्हणून चिडचिड करतात. त्यांच्या लक्षतच येत नाहीये की आता त्यांच्या बरोबर भाजपा नाही तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस असायला हवी आहे. ते दोन्ही मित्रपक्ष काही करत नाहीत, नुसते मजा पहातात ह्याचा राग विरोधी पक्षावर कसा काय काढता येईल??
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तर लक्षातच राहिले नाहीये बहुदा की आपण आता सत्तेत आहोत, विरोधी बाकावर नाही. ह्या इतक्या कठीण परिस्थितीत सेनेबरोबर पर्यायाने जनतेबरोबर उभे राहणे आपले नैतिक कर्तव्य आहे ह्याचा त्यांना विसर पडलेला दिसतो आहे. ते दोघे अजूनही सेना विरोधात असल्यासारखे वागत आहेत. राष्ट्रवादीचे ठाण्यात एक आणि काँग्रेस चे संगमनेर मध्ये एक नेते सोडले तर बाकीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते अचानक कुठे गायब झाले आहेत काही कळत नाही.
शक्यतो सगळ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या नेत्यांची मोठमोठी शैक्षणिक संकुले आहेत. काहींची वैद्यकीय महाविद्यालये आणि हॉस्पिटल ही आहेत. शिवाय हे दोन्ही पक्ष सम्पन्न आहेत. कोव्हिड सेंटर, धान्य वाटप केंद्र उभे करणे दोन्ही पक्षांनाही अवघड नाही. पण असे कुठे झालेले दिसत नाही. केंद्रात भाजपा ची तुम्ही मजा पहिली तर समजू शकतो पण राज्यात ?? इथे तर तुम्हीच सरकार आहात ना?? मग का नाही तुमचे नेते आणि कार्यकर्ते सेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांबरोबर खांद्याला खांदा लावून लढताना दिसत?? मान्य, की सेने ला एकट्याला राज्यकारभाराचा अनुभव नाही. पण तुमच्याकडे तर एकापेक्षा एक धुरंधर धुरीण नेते आहेत, ज्यांचा प्रशासकीय अनुभव आणि हतोटी सर्वदूर प्रसिद्ध आहे. का नाही सेनेच्या बरोबरीने तुम्ही लढताना, निर्णय घेताना, घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी घेताना, घेतलेले निर्णय राबवताना दिसत??
मोदी सरकार कसे वाईट आहे, सेनेच्या नेत्यांनी कशी नीट कामे केली नाहीत हे सगळे बोलायला 2024 च्या निवडणूक रॅली मध्ये संधी मिळणार आहेच की. पण तेव्हा निवडणुकीत उभे राहायला नेते, त्यांच्या मागे फिरायला कार्यकर्ते आणि मत द्यायला मतदार जिवंत तर राहायला हवेत ना. 'कोरोना' आपली गमंत बघेल त्या आधी जबाबदारी ओळखा आणि उचला. अन्यथा जे काही जिवंत राहिलेले मतदार असतील ते 2019 पेक्षा वाईट मतांनी पृथ्वीवरील तुमचे अस्तित्व सम्पवतील. भविष्यात 'जिवंतपणी मरण म्हणजे काय' ह्याचे उदाहरण म्हणून तुमची मिसाल दिली जाईल.
सेनेचे 'सोयरे' आहात तर त्यांची 'सोय' पहा.. आयुष्यभर ज्यांच्या जीवावर राज्य केलेत त्या जनतेची वेळ सांभाळा. पेराल ते उगवते म्हणतात.
कळावे, लोभ असावा
- ॲड स्वाती आवटी दीक्षित
तो सोयरा ..
आज बोलता बोलता अचानक एका गृहस्थांची गाडी घसरली 'काँग्रेस चे सरकार असते तर इतका गोंधळ झालाच नसता'. काँग्रेसचेच सरकार आहे, सरकार मध्ये सेना, राष्ट्रवादी बरोबर काँग्रेस पण आहे हे जेव्हा लक्षात आणून दिले तेव्हा सारवासारवी करताना गाडी अचानक 'ही सगळी मोदींची चूक आहे' म्हणून केंद्रावर घसरली.
माझे अपयश झाकायला मी दुसऱ्याकडे बोट दाखवले की झाले, असे काहीसे झाले आहे सध्या लोकांचे. लोकांचे सोडाच पण सेनेच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे पण असेच काहीसे झाले आहे. इतके वर्ष भाजपा बरोबर खांद्याला खांदा लावून काम करायची इतकी सवय झाली होती आणि आता भाजपा त्यांच्या बरोबर नाहीये तर 'भाजपा वाले काही करत नाहीत' म्हणून चिडचिड करतात. त्यांच्या लक्षतच येत नाहीये की आता त्यांच्या बरोबर भाजपा नाही तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस असायला हवी आहे. ते दोन्ही मित्रपक्ष काही करत नाहीत, नुसते मजा पहातात ह्याचा राग विरोधी पक्षावर कसा काय काढता येईल??
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तर लक्षातच राहिले नाहीये बहुदा की आपण आता सत्तेत आहोत, विरोधी बाकावर नाही. ह्या इतक्या कठीण परिस्थितीत सेनेबरोबर पर्यायाने जनतेबरोबर उभे राहणे आपले नैतिक कर्तव्य आहे ह्याचा त्यांना विसर पडलेला दिसतो आहे. ते दोघे अजूनही सेना विरोधात असल्यासारखे वागत आहेत. राष्ट्रवादीचे ठाण्यात एक आणि काँग्रेस चे संगमनेर मध्ये एक नेते सोडले तर बाकीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते अचानक कुठे गायब झाले आहेत काही कळत नाही.
शक्यतो सगळ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या नेत्यांची मोठमोठी शैक्षणिक संकुले आहेत. काहींची वैद्यकीय महाविद्यालये आणि हॉस्पिटल ही आहेत. शिवाय हे दोन्ही पक्ष सम्पन्न आहेत. कोव्हिड सेंटर, धान्य वाटप केंद्र उभे करणे दोन्ही पक्षांनाही अवघड नाही. पण असे कुठे झालेले दिसत नाही. केंद्रात भाजपा ची तुम्ही मजा पहिली तर समजू शकतो पण राज्यात ?? इथे तर तुम्हीच सरकार आहात ना?? मग का नाही तुमचे नेते आणि कार्यकर्ते सेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांबरोबर खांद्याला खांदा लावून लढताना दिसत?? मान्य, की सेने ला एकट्याला राज्यकारभाराचा अनुभव नाही. पण तुमच्याकडे तर एकापेक्षा एक धुरंधर धुरीण नेते आहेत, ज्यांचा प्रशासकीय अनुभव आणि हतोटी सर्वदूर प्रसिद्ध आहे. का नाही सेनेच्या बरोबरीने तुम्ही लढताना, निर्णय घेताना, घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी घेताना, घेतलेले निर्णय राबवताना दिसत??
मोदी सरकार कसे वाईट आहे, सेनेच्या नेत्यांनी कशी नीट कामे केली नाहीत हे सगळे बोलायला 2024 च्या निवडणूक रॅली मध्ये संधी मिळणार आहेच की. पण तेव्हा निवडणुकीत उभे राहायला नेते, त्यांच्या मागे फिरायला कार्यकर्ते आणि मत द्यायला मतदार जिवंत तर राहायला हवेत ना. 'कोरोना' आपली गमंत बघेल त्या आधी जबाबदारी ओळखा आणि उचला. अन्यथा जे काही जिवंत राहिलेले मतदार असतील ते 2019 पेक्षा वाईट मतांनी पृथ्वीवरील तुमचे अस्तित्व सम्पवतील. भविष्यात 'जिवंतपणी मरण म्हणजे काय' ह्याचे उदाहरण म्हणून तुमची मिसाल दिली जाईल.
सेनेचे 'सोयरे' आहात तर त्यांची 'सोय' पहा.. आयुष्यभर ज्यांच्या जीवावर राज्य केलेत त्या जनतेची वेळ सांभाळा. पेराल ते उगवते म्हणतात.
कळावे, लोभ असावा
- ॲड स्वाती आवटी दीक्षित
No comments:
Post a Comment