मुलगी शिकली
प्रगती झाली ..
हल्ली सगळ्याच व्यवसायांच्या सर्वच क्षेत्रात विशेषज्ञ असतात. प्रत्येक अवयवांसाठी वेगळे डॉक्टर, वेगवेगळ्या करप्रणालीसाठी त्या विषयांचे तज्ञ लेखापाल तसेच प्रत्येक वेगळ्या भांडणासाठी वेगळे न्यायालय आणि वेगळा वकील. असे जरी असले तरी बरेचदा भलत्याच विषयावर सल्ला मागायला येणाऱ्यांची वकिली क्षेत्रात तरी वानवा नाही. कुटुंब खटल्यांमध्ये माझे काम नसतानाही बरेचदा कोणाच्यातरी ओळखीतून लोक शोधत येतात आणि एक एक महाभयंकर गोष्टी आणि अनुभूव उलगडले जातात.
एका मुलीने इच्छे विरुद्ध लग्नाला होकार दिला. लग्न झाले, दिवस राहिले, 'मी मूल सांभाळणार नाही, तुला हवे असेल तर त्याचे सगळे तूच करायचे' सांगून मोकळी, पालकांच्या मदतीने त्याने ते शिवधनुष्य पेलले पण एक दिवस त्याला कळाले की ती ऑफिस मधून परस्पर तिच्या पूर्वाश्रमीच्या मित्राला भेटायला जाते. त्याच्याबरोबर ऑफिस चे काम आहे सांगून अनेक दिवस फिरायला जाते... काय करावे त्या मुलाने ?? पदरी छोटा मुलगा आणि बायकोची ही तऱ्हा.
दुसऱ्या एका खटल्यात लग्न चांगले गाजत वाजत झाले. देव-देवी-हनिमून झाला. मुलगा परत ऑफिक मध्ये जाऊ लागला. एक दिवस घरी येऊन बघतो तर मुलगी पैसे आणि दागिने घेऊन लंपास. आधीचे काही प्रकरण होते म्हणे.
बघण्याचा कार्यक्रम झाला, त्याच्यावर घराची म्हणजे आई-वडील आणि अविवाहित बहिणीची जबाबदारी आहे हे आधीच सांगितले. तेव्हा सर्व मान्य करून होकार आला. जसे लग्न झाले मुलीचे रूप पालटले. आई-वडील-बहीण ह्यांना भेटायचे नाही, त्यांच्या घरी जायचे नाही, त्यांना आपल्या घरी बोलवायचे नाही, त्यांना साधा फोन पण करायचा नाही की त्यांनीही आपल्याला फोन करता कामा नये.
नात्यातून स्थळ आलं, मुलाचे काका आणि मुलीचे वडील ओळखीचे. उंची, कुळ, घराण सगळं चांगले जुळले, लग्न ठरले. मुलीला स्वयंपाक, घरकामात काही गती नव्हती, नोकरी कर म्हणावे तर तिथेही सगळा उत्साहच. आल्यापासून एकच भुणभुण 'इथेच वेगळे राहू नाहीतरी माझ्या माहेरी जाऊ'. शेवटी लेकरांना उचलले आणि निघून गेली. तीन (३)/ चार (४) वर्ष वाट पाहिली, नांदायला यायला दावा दाखल केला, न्यायालयाच्या चकरा मारून मारून दमला. शेवटी मुलांच्या ओढीने गेला तो पण तिच्या मागे.
ही सर्व बघून, ठरवून, रीतसर चहा-पोहे कार्यक्रम करून ठरलेली लग्न. सगळ्या मुली चांगल्या शिकलेल्या. हल्ली हे चित्र कुटुंब न्यायालयात सर्रास बघायला मिळते. मूलाकडचे एकवेळ तडजोडीला तयार होतील पण मुलगी आणि तिची आई बिलकुल तयार होणार नाहीत. मुलाकडून मुलगा आणि त्याचा वकील लढत असतो तर मुलीकडून मुलगी, तिची आई आणि मध्ये बोलू दिले तर तिचा वकील. मुलाचे आरोप हे त्या दोघांसंदर्भात असतात, मुलीचे तसे नसते. एकतर सगळे आरोप मुलीची आई ठरवणार, ठरवताना मुलीचे अनुभव अधिक त्या बाईंच्या आयुष्यात त्यांना भोगावा लागलेला त्रास आणि इकडून तिकडून ऐकलेल्या सुरस कहाण्या असे संमिश्र प्रकरण असते. मागण्या तरी काय ? आमची मुलगी शिकली ती पोळ्या करणार नाही, सारखे सारखे पाहुणे नको, रात्री पार्टी ला जाऊ द्यावे लागेल, सुट्टीच्या दिवशी बाहेर नेले पाहिजे, महिन्यातून दोनदा माहेरी जाऊ दिले पाहिजे, तिचा पगार हा फक्त तिचाच असेल त्यातून ती घरात काहीही देणार नाही,दिवाळी व्यतिरीक्त ती सासरी येणार नाही, सासू सासऱ्यांबरोबर एकत्र राहणार नाही, इ.
असे अजिबात नाही की मुलींवर अन्याय होतच नाहीत किंवा खरे ,प्रामाणिक खटले नसतातच. पण ह्या अशा नाटकी खटल्यांचे प्रकार हल्ली फार वाढले आहेत. केवळ आमची मुलगी कमावते, तिला कोणाची गरज नाही, ती तिच्या पायावर उभी राहू शकते हा फाजील विश्वास. कमावण्याचा आणि सहजीवनाचा सम्बन्धच काय?? लग्न करून पायावर नाही का उभे राहता येत ?? वरील सर्व उदाहरणांमध्ये सगळ्या मुलींना मुले झाली आहेत. मग मूल होईपर्यंत तुम्हाला अंदाज येत नाही का सासरच्या लोकांचा ?? की मूल झाल्यावर गरज सम्पून जाते सहजीवनाची??
वरील सर्व प्रकरणांमध्ये तर आपण काही करू शकत नाही. पण आपली मुलगी तिच्या सासरी असे वागणार नाही ह्याची जरी प्रत्येक आईने काळजी घेतली तर भविष्यात आपल्या घरी येणारी सून आपल्यावर ही वेळ आणणार नाही.
कळावे, लोभ असावा.
- ॲड. स्वाती आवटी दीक्षित
प्रगती झाली ..
हल्ली सगळ्याच व्यवसायांच्या सर्वच क्षेत्रात विशेषज्ञ असतात. प्रत्येक अवयवांसाठी वेगळे डॉक्टर, वेगवेगळ्या करप्रणालीसाठी त्या विषयांचे तज्ञ लेखापाल तसेच प्रत्येक वेगळ्या भांडणासाठी वेगळे न्यायालय आणि वेगळा वकील. असे जरी असले तरी बरेचदा भलत्याच विषयावर सल्ला मागायला येणाऱ्यांची वकिली क्षेत्रात तरी वानवा नाही. कुटुंब खटल्यांमध्ये माझे काम नसतानाही बरेचदा कोणाच्यातरी ओळखीतून लोक शोधत येतात आणि एक एक महाभयंकर गोष्टी आणि अनुभूव उलगडले जातात.
एका मुलीने इच्छे विरुद्ध लग्नाला होकार दिला. लग्न झाले, दिवस राहिले, 'मी मूल सांभाळणार नाही, तुला हवे असेल तर त्याचे सगळे तूच करायचे' सांगून मोकळी, पालकांच्या मदतीने त्याने ते शिवधनुष्य पेलले पण एक दिवस त्याला कळाले की ती ऑफिस मधून परस्पर तिच्या पूर्वाश्रमीच्या मित्राला भेटायला जाते. त्याच्याबरोबर ऑफिस चे काम आहे सांगून अनेक दिवस फिरायला जाते... काय करावे त्या मुलाने ?? पदरी छोटा मुलगा आणि बायकोची ही तऱ्हा.
दुसऱ्या एका खटल्यात लग्न चांगले गाजत वाजत झाले. देव-देवी-हनिमून झाला. मुलगा परत ऑफिक मध्ये जाऊ लागला. एक दिवस घरी येऊन बघतो तर मुलगी पैसे आणि दागिने घेऊन लंपास. आधीचे काही प्रकरण होते म्हणे.
बघण्याचा कार्यक्रम झाला, त्याच्यावर घराची म्हणजे आई-वडील आणि अविवाहित बहिणीची जबाबदारी आहे हे आधीच सांगितले. तेव्हा सर्व मान्य करून होकार आला. जसे लग्न झाले मुलीचे रूप पालटले. आई-वडील-बहीण ह्यांना भेटायचे नाही, त्यांच्या घरी जायचे नाही, त्यांना आपल्या घरी बोलवायचे नाही, त्यांना साधा फोन पण करायचा नाही की त्यांनीही आपल्याला फोन करता कामा नये.
नात्यातून स्थळ आलं, मुलाचे काका आणि मुलीचे वडील ओळखीचे. उंची, कुळ, घराण सगळं चांगले जुळले, लग्न ठरले. मुलीला स्वयंपाक, घरकामात काही गती नव्हती, नोकरी कर म्हणावे तर तिथेही सगळा उत्साहच. आल्यापासून एकच भुणभुण 'इथेच वेगळे राहू नाहीतरी माझ्या माहेरी जाऊ'. शेवटी लेकरांना उचलले आणि निघून गेली. तीन (३)/ चार (४) वर्ष वाट पाहिली, नांदायला यायला दावा दाखल केला, न्यायालयाच्या चकरा मारून मारून दमला. शेवटी मुलांच्या ओढीने गेला तो पण तिच्या मागे.
ही सर्व बघून, ठरवून, रीतसर चहा-पोहे कार्यक्रम करून ठरलेली लग्न. सगळ्या मुली चांगल्या शिकलेल्या. हल्ली हे चित्र कुटुंब न्यायालयात सर्रास बघायला मिळते. मूलाकडचे एकवेळ तडजोडीला तयार होतील पण मुलगी आणि तिची आई बिलकुल तयार होणार नाहीत. मुलाकडून मुलगा आणि त्याचा वकील लढत असतो तर मुलीकडून मुलगी, तिची आई आणि मध्ये बोलू दिले तर तिचा वकील. मुलाचे आरोप हे त्या दोघांसंदर्भात असतात, मुलीचे तसे नसते. एकतर सगळे आरोप मुलीची आई ठरवणार, ठरवताना मुलीचे अनुभव अधिक त्या बाईंच्या आयुष्यात त्यांना भोगावा लागलेला त्रास आणि इकडून तिकडून ऐकलेल्या सुरस कहाण्या असे संमिश्र प्रकरण असते. मागण्या तरी काय ? आमची मुलगी शिकली ती पोळ्या करणार नाही, सारखे सारखे पाहुणे नको, रात्री पार्टी ला जाऊ द्यावे लागेल, सुट्टीच्या दिवशी बाहेर नेले पाहिजे, महिन्यातून दोनदा माहेरी जाऊ दिले पाहिजे, तिचा पगार हा फक्त तिचाच असेल त्यातून ती घरात काहीही देणार नाही,दिवाळी व्यतिरीक्त ती सासरी येणार नाही, सासू सासऱ्यांबरोबर एकत्र राहणार नाही, इ.
असे अजिबात नाही की मुलींवर अन्याय होतच नाहीत किंवा खरे ,प्रामाणिक खटले नसतातच. पण ह्या अशा नाटकी खटल्यांचे प्रकार हल्ली फार वाढले आहेत. केवळ आमची मुलगी कमावते, तिला कोणाची गरज नाही, ती तिच्या पायावर उभी राहू शकते हा फाजील विश्वास. कमावण्याचा आणि सहजीवनाचा सम्बन्धच काय?? लग्न करून पायावर नाही का उभे राहता येत ?? वरील सर्व उदाहरणांमध्ये सगळ्या मुलींना मुले झाली आहेत. मग मूल होईपर्यंत तुम्हाला अंदाज येत नाही का सासरच्या लोकांचा ?? की मूल झाल्यावर गरज सम्पून जाते सहजीवनाची??
वरील सर्व प्रकरणांमध्ये तर आपण काही करू शकत नाही. पण आपली मुलगी तिच्या सासरी असे वागणार नाही ह्याची जरी प्रत्येक आईने काळजी घेतली तर भविष्यात आपल्या घरी येणारी सून आपल्यावर ही वेळ आणणार नाही.
कळावे, लोभ असावा.
- ॲड. स्वाती आवटी दीक्षित
No comments:
Post a Comment