जिंकू किंवा मरू ..
जगात दोन प्रकारचे लोक असतात, कर्ण आणि श्रीकृष्ण प्रवृत्तीचे. दोघांचा जन्म विचित्र वातावरणात झाला. दोघेही जन्मतः मातेपासून दुरावले. दोघांनाही वेळेत शिक्षण नाही मिळाले. राजवंशात जन्म घेऊन सुद्धा एकाला गोपपुत्र आणि एकाला सुतपुत्र म्हणवून घ्यावे लागले.
पण ह्या सर्व परिस्थितीचा दोघांवर झालेला परिणाम मात्र वेगवेगळा होता. 'माझ्यावर अमूक अमुक वेळ आली' अशी एकाने सतत तक्रार केली. तर आलेल्या परिस्थितीशी एकाने हसून मुकाबला केला आणि जी जशी मिळेल त्या संधीचे सोने केले.
आजूबाजूला जरा आजमावले तर ह्या प्रवृत्ती अजूनही सहज बघायला मिळतात. सध्या सगळ्यांच्याच मनावर आरोग्य, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक तणाव आहे. त्यातही काही लोक मात्र व्यवस्थित मार्ग काढताना दिसतात. एका वृत्तवाहिनीवर दाखवत होते, लाकडी सामानाचे दुकान असणाऱ्या एका गृहस्थांनी सध्या भाजी आणि फळे ह्यांना मिळत असलेला उठाव पाहून त्याच व्यवसायाला सुरवात केली. एकाने दूध विकण्याचे काम करू केले. कितीतरी शहरात रहात असणारे परंतु गावी शेती असणाऱ्या लोकांनी, आपल्या गावच्या लोकांशी संधान बांधून शहरातून भाजी आणि फळांच्या ठोस आगाऊ मागण्या नोंदवून त्याच्या विक्रीचा व्यवसाय नव्याने सुरू केला. कोणी घरगुती मास्क शिवून त्याच्या विक्रीतून पैसे कमावले. कोणी खाद्यपदार्थ, पाठ्यक्रम, कलाकारी, व्यक्तिमत्व विकास, नृत्य, विविध भाषा, इ. अनेक विषयांच्या ऑनलाइन शिकवण्या घेतल्या. हे सर्व त्या श्रीकृष्ण वंशावळीचे प्रतिनिधी.
काही लोक मात्र आता कसे होणार आणि काय होणार ह्या चिंतेत मग्न. अडचणीपेक्षा ह्या लोकांचा त्रास अधिक. समाजमाध्यमांवर कविता, लेख, एखादा मेसेज, चित्र, दुसऱ्याच्या लिखाणावर प्रतिक्रिया,इ कुठेल्याही प्रकारे व्यक्त होण्याची वेळ आली की ह्यांचा नकारात्मक सूर लागतोच लागतो. विचार करा ह्या लोकांच्या संपर्कात त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था होत असेल. कोरोनाचा संसर्ग झालाच नाही तर बरे हा विचार सुद्धा ह्या लोकांना शिवत नाही. उलट कोरोनाची चाचणी किती महाग, दवाखाने पूर्ण भरलेले, रुग्णवाहिका नाही मिळत, कदाचित मरण सुद्धा येऊ शकते,इ विचारांनीच हैराण. घरात बसावे लागते, काम नाही, कांम बंद तर पैसे नाही, बाहेर पडावे तर कोरोना पकडले, नाही गेलो तर घरात बसावे लागेल हे असे विचारांचे चक्र त्याच त्याच रुळांवर परत परत फिरत रहाते. ह्यातूनच व्यसने, घरातल्यांचा शारीरिक, मानसिक छळ,इ. गोष्टी घडतात. त्याचा दुष्परिणाम कुटुंबाला भोगावा लागतो.
प्रसंग आला आहे, त्याला तोंड देणे हा एकच मार्ग आपल्याकडे आहे. अनंत अडचणी आहेत, त्यातून मार्ग काढावाच लागणार आहे. कदाचित संसर्ग होईल, कदाचित नाही होणार. पन्नास पन्नास टक्के संधी आहे. लस उपलब्ध नाही पण काळजी काय घ्यायची ह्याची पूर्ण कल्पना आहे. पळून जाण्याचे सगळे मार्ग बंद आहेत कारण साथीने संपूर्ण जगात उच्छाद मांडला आहे. जाऊन जाणार कुठे? जर लढायचेच आहे तर न रडता मनाची तशी तयारी करूयात. कोरोनाच्या साथीला हरवूयात.
कळावे, लोभ असावा
-Adv स्वाती आवटी दीक्षित
जगात दोन प्रकारचे लोक असतात, कर्ण आणि श्रीकृष्ण प्रवृत्तीचे. दोघांचा जन्म विचित्र वातावरणात झाला. दोघेही जन्मतः मातेपासून दुरावले. दोघांनाही वेळेत शिक्षण नाही मिळाले. राजवंशात जन्म घेऊन सुद्धा एकाला गोपपुत्र आणि एकाला सुतपुत्र म्हणवून घ्यावे लागले.
पण ह्या सर्व परिस्थितीचा दोघांवर झालेला परिणाम मात्र वेगवेगळा होता. 'माझ्यावर अमूक अमुक वेळ आली' अशी एकाने सतत तक्रार केली. तर आलेल्या परिस्थितीशी एकाने हसून मुकाबला केला आणि जी जशी मिळेल त्या संधीचे सोने केले.
आजूबाजूला जरा आजमावले तर ह्या प्रवृत्ती अजूनही सहज बघायला मिळतात. सध्या सगळ्यांच्याच मनावर आरोग्य, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक तणाव आहे. त्यातही काही लोक मात्र व्यवस्थित मार्ग काढताना दिसतात. एका वृत्तवाहिनीवर दाखवत होते, लाकडी सामानाचे दुकान असणाऱ्या एका गृहस्थांनी सध्या भाजी आणि फळे ह्यांना मिळत असलेला उठाव पाहून त्याच व्यवसायाला सुरवात केली. एकाने दूध विकण्याचे काम करू केले. कितीतरी शहरात रहात असणारे परंतु गावी शेती असणाऱ्या लोकांनी, आपल्या गावच्या लोकांशी संधान बांधून शहरातून भाजी आणि फळांच्या ठोस आगाऊ मागण्या नोंदवून त्याच्या विक्रीचा व्यवसाय नव्याने सुरू केला. कोणी घरगुती मास्क शिवून त्याच्या विक्रीतून पैसे कमावले. कोणी खाद्यपदार्थ, पाठ्यक्रम, कलाकारी, व्यक्तिमत्व विकास, नृत्य, विविध भाषा, इ. अनेक विषयांच्या ऑनलाइन शिकवण्या घेतल्या. हे सर्व त्या श्रीकृष्ण वंशावळीचे प्रतिनिधी.
काही लोक मात्र आता कसे होणार आणि काय होणार ह्या चिंतेत मग्न. अडचणीपेक्षा ह्या लोकांचा त्रास अधिक. समाजमाध्यमांवर कविता, लेख, एखादा मेसेज, चित्र, दुसऱ्याच्या लिखाणावर प्रतिक्रिया,इ कुठेल्याही प्रकारे व्यक्त होण्याची वेळ आली की ह्यांचा नकारात्मक सूर लागतोच लागतो. विचार करा ह्या लोकांच्या संपर्कात त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था होत असेल. कोरोनाचा संसर्ग झालाच नाही तर बरे हा विचार सुद्धा ह्या लोकांना शिवत नाही. उलट कोरोनाची चाचणी किती महाग, दवाखाने पूर्ण भरलेले, रुग्णवाहिका नाही मिळत, कदाचित मरण सुद्धा येऊ शकते,इ विचारांनीच हैराण. घरात बसावे लागते, काम नाही, कांम बंद तर पैसे नाही, बाहेर पडावे तर कोरोना पकडले, नाही गेलो तर घरात बसावे लागेल हे असे विचारांचे चक्र त्याच त्याच रुळांवर परत परत फिरत रहाते. ह्यातूनच व्यसने, घरातल्यांचा शारीरिक, मानसिक छळ,इ. गोष्टी घडतात. त्याचा दुष्परिणाम कुटुंबाला भोगावा लागतो.
प्रसंग आला आहे, त्याला तोंड देणे हा एकच मार्ग आपल्याकडे आहे. अनंत अडचणी आहेत, त्यातून मार्ग काढावाच लागणार आहे. कदाचित संसर्ग होईल, कदाचित नाही होणार. पन्नास पन्नास टक्के संधी आहे. लस उपलब्ध नाही पण काळजी काय घ्यायची ह्याची पूर्ण कल्पना आहे. पळून जाण्याचे सगळे मार्ग बंद आहेत कारण साथीने संपूर्ण जगात उच्छाद मांडला आहे. जाऊन जाणार कुठे? जर लढायचेच आहे तर न रडता मनाची तशी तयारी करूयात. कोरोनाच्या साथीला हरवूयात.
कळावे, लोभ असावा
-Adv स्वाती आवटी दीक्षित
No comments:
Post a Comment