दोन डोळे शेजारी
भेट नाही संसारी..
आईला सोडून धाकटा भाऊ वेगळा निघाला. मोठ्या भावाला अक्षरशः लुबाडून, जाता जाता त्याचे मानसिक, आर्थिक, सामाजीक खच्चीकरण करून. मोठाच तो ... शांतपणे पितामह सांगतील तसे वागला, पैसे दिले, जमीन दिली, प्रत्येक मागणी पूर्ण केली. इतकी की मोठ्याच्या घरातले वैतागले, कंटाळले ह्या मोठेपणाला..... उद्रेक उद्रेक फक्त उद्रेक.
येवढ्यावरच संपणार नव्हतं हे प्रकरण. आयत मिळतंय म्हंटल्यावर धाकट्याची भूक वाढू लागली. अजून जमीन हवी... मोठ्याचे नाक कापायचे होते त्याला, त्याचा मान हिरावून घ्यायचा होता. धाकट्याला सगळीकडे मी, मी आणि मीच दिसत होता. शेजारी-पाजारी, नातेवाईक, मोठ्याचे मित्र आणि शत्रूही सगळ्यांजवळ मोठ्याच्या कागाळ्या करून झाल्या. शत्रूशी मैत्री करून झाली. स्वतःच्या मुलांच्या मनातही मोठ्या बद्दल विष कालवले गेले. त्यांची मोठ्याच्या विरुद्ध लढायला फौज तयार केली गेली. मोठा हे सगळं सहन करत होता.... त्याच्या आईसाठी. असेही होते कोण त्याची बाजू समजून घेणारे, त्याच ऐकणारे, त्याची बाजू मांडणारे. त्याच्या घरातल्यांची घालमेल होत होती. गरिबीच्या लाचारीची चीड येत होती. एकेकाळी ऐश्वर्य भोगलेल्या त्या कुटुंबाला दारिद्र्याचे चटके सहन होत नव्हते. त्याहीपेक्षा आपल्या जीवावर उड्या मारणारा आणि परत परत लचके तोडण्याचा प्रयत्न करणारा तो धकट्याचा शेजार असह्य होत होता.
मोठ्याचे मन तरी किती मोठे असावे? इतके होऊनही धकट्याचे जे नातेवाईक त्याच्याबरोबर गेले नाहीत, त्यांच्या पाठीशी मोठा उभा राहीला. घरातल्यांनी आक्रोश केला , सपाटून विरोध केला, पितामहनचे प्राण हिरावून घेतले गेले पण मोठा ठाम राहिला. पितृशोक सहन करून तो धाकट्याच्या जुमल्याचे करतच राहिला. धाकटा विकृत, त्याने त्याच्या मागे सुटलेल्या कबिल्याच्या मदतीने मोठ्याच्या घरात घुसून त्रास द्यायला सुरुवात केली. मोठ्याची कित्येक लेकरं ह्या दगाबाजीत कामी आली. सततचा उपहास आणि निंदा, त्यात दारिद्र ... मोठ्याच्या घराने निर्णय क्षमताच गमावली होती. काहीही झाले की धकट्याचे नातेवाईक फुसफुसायला लागायचे 'आमचा अपमान झाला' , रडारड सुरू व्हायची 'आमच्याकडे कोणी लक्षच देत नाही', तक्रारींचा पाढा सुरू व्हायचा 'आम्हाला हे फुकट द्या, ते फुकट द्या' 'आमचे नियम वेगळे, तुमचे वेगळे, तुमच्या नियमात आम्ही बसणार नाही'. भांडणे, मारामाऱ्या, नुकसान तर पाचवीलाच पुजलेले. मोठ्याचे कुटुंब आपल्याच घरात पाहुणे झाले. घाबरून राहू लागले. समाजात बोलताना, वावरताना धाकट्याच्या नातेसंबंधांना भिऊन राहू लागले. हा बोटचेपेपणा इतका वाढला की मोठ्याचीच काही लेकरे कातडी बचाव धोरणं अंगीकारून धाकट्याच्या कबिल्यासाठी नक्राश्रु गाळू लागली, त्यांच्या बाजूने बोलून आपल्याच बांधवांना शापू लागली.
आणि एक दिवस पाळणा हलला ' राम जन्मला ग सखे राम जन्माला'. सगळीकडे आनंदी आनंद झाला. धाकटा घाबरला, कुठे जाऊ, काय करू, कसे लपू काही समजेनासे झाले. जाऊ तिथे रामाचा जयजयकार. पूर्वीची परिस्थिती आता राहिली नाही. धकट्याचे कोणी ऐकेना. सगळे फटकारू लागले. आणि एक दिवस रामाची वानरसेना ह्या गोंधळलेल्या धाकट्याला अजून बुचकळ्यात टाकून त्याच्या शामियान्याचे कळस कापून घेऊन आली. धाकटा चवताळला, चरफडला, हताश झाला. आमच्याकडे कळस नव्हतेच सांगून स्वतःचे हसू करून घेऊ लागला. इतके होऊनही धाकट्याची खोडकी मोडली नव्हती. मी घाबरलो नाही आहे, हे दाखवण्यासाठी बहुदा , अधून मधून कुरापती काढतच होता.
पण आज मोठ्याच्या कुटुंबाने बाळसे धरले आहे. पाठीचा कणा सरळ झाला आहे. मान ताठ झाली आहे. समाजात इभ्रत वाढली आहे. धाकट्याने आणि त्याच्या कबिल्याने आता जरा सबुरीने घ्यावे.... नाहीतर रामाची वानरसेना आता अख्खा शामियानाच घरी घेऊन येतील.
जय श्रीराम !!
कळावे, लोभ असावा
- ॲड स्वाती आवटी दीक्षित
( ता.क. हा फक्त आणि फक्त दोन भावांच्या भांडणाबद्दल लिहिलेला लेख आहे, भावांच्या जागी बहिणी असेही वाचू शकतात पण देश नाही)
भेट नाही संसारी..
आईला सोडून धाकटा भाऊ वेगळा निघाला. मोठ्या भावाला अक्षरशः लुबाडून, जाता जाता त्याचे मानसिक, आर्थिक, सामाजीक खच्चीकरण करून. मोठाच तो ... शांतपणे पितामह सांगतील तसे वागला, पैसे दिले, जमीन दिली, प्रत्येक मागणी पूर्ण केली. इतकी की मोठ्याच्या घरातले वैतागले, कंटाळले ह्या मोठेपणाला..... उद्रेक उद्रेक फक्त उद्रेक.
येवढ्यावरच संपणार नव्हतं हे प्रकरण. आयत मिळतंय म्हंटल्यावर धाकट्याची भूक वाढू लागली. अजून जमीन हवी... मोठ्याचे नाक कापायचे होते त्याला, त्याचा मान हिरावून घ्यायचा होता. धाकट्याला सगळीकडे मी, मी आणि मीच दिसत होता. शेजारी-पाजारी, नातेवाईक, मोठ्याचे मित्र आणि शत्रूही सगळ्यांजवळ मोठ्याच्या कागाळ्या करून झाल्या. शत्रूशी मैत्री करून झाली. स्वतःच्या मुलांच्या मनातही मोठ्या बद्दल विष कालवले गेले. त्यांची मोठ्याच्या विरुद्ध लढायला फौज तयार केली गेली. मोठा हे सगळं सहन करत होता.... त्याच्या आईसाठी. असेही होते कोण त्याची बाजू समजून घेणारे, त्याच ऐकणारे, त्याची बाजू मांडणारे. त्याच्या घरातल्यांची घालमेल होत होती. गरिबीच्या लाचारीची चीड येत होती. एकेकाळी ऐश्वर्य भोगलेल्या त्या कुटुंबाला दारिद्र्याचे चटके सहन होत नव्हते. त्याहीपेक्षा आपल्या जीवावर उड्या मारणारा आणि परत परत लचके तोडण्याचा प्रयत्न करणारा तो धकट्याचा शेजार असह्य होत होता.
मोठ्याचे मन तरी किती मोठे असावे? इतके होऊनही धकट्याचे जे नातेवाईक त्याच्याबरोबर गेले नाहीत, त्यांच्या पाठीशी मोठा उभा राहीला. घरातल्यांनी आक्रोश केला , सपाटून विरोध केला, पितामहनचे प्राण हिरावून घेतले गेले पण मोठा ठाम राहिला. पितृशोक सहन करून तो धाकट्याच्या जुमल्याचे करतच राहिला. धाकटा विकृत, त्याने त्याच्या मागे सुटलेल्या कबिल्याच्या मदतीने मोठ्याच्या घरात घुसून त्रास द्यायला सुरुवात केली. मोठ्याची कित्येक लेकरं ह्या दगाबाजीत कामी आली. सततचा उपहास आणि निंदा, त्यात दारिद्र ... मोठ्याच्या घराने निर्णय क्षमताच गमावली होती. काहीही झाले की धकट्याचे नातेवाईक फुसफुसायला लागायचे 'आमचा अपमान झाला' , रडारड सुरू व्हायची 'आमच्याकडे कोणी लक्षच देत नाही', तक्रारींचा पाढा सुरू व्हायचा 'आम्हाला हे फुकट द्या, ते फुकट द्या' 'आमचे नियम वेगळे, तुमचे वेगळे, तुमच्या नियमात आम्ही बसणार नाही'. भांडणे, मारामाऱ्या, नुकसान तर पाचवीलाच पुजलेले. मोठ्याचे कुटुंब आपल्याच घरात पाहुणे झाले. घाबरून राहू लागले. समाजात बोलताना, वावरताना धाकट्याच्या नातेसंबंधांना भिऊन राहू लागले. हा बोटचेपेपणा इतका वाढला की मोठ्याचीच काही लेकरे कातडी बचाव धोरणं अंगीकारून धाकट्याच्या कबिल्यासाठी नक्राश्रु गाळू लागली, त्यांच्या बाजूने बोलून आपल्याच बांधवांना शापू लागली.
आणि एक दिवस पाळणा हलला ' राम जन्मला ग सखे राम जन्माला'. सगळीकडे आनंदी आनंद झाला. धाकटा घाबरला, कुठे जाऊ, काय करू, कसे लपू काही समजेनासे झाले. जाऊ तिथे रामाचा जयजयकार. पूर्वीची परिस्थिती आता राहिली नाही. धकट्याचे कोणी ऐकेना. सगळे फटकारू लागले. आणि एक दिवस रामाची वानरसेना ह्या गोंधळलेल्या धाकट्याला अजून बुचकळ्यात टाकून त्याच्या शामियान्याचे कळस कापून घेऊन आली. धाकटा चवताळला, चरफडला, हताश झाला. आमच्याकडे कळस नव्हतेच सांगून स्वतःचे हसू करून घेऊ लागला. इतके होऊनही धाकट्याची खोडकी मोडली नव्हती. मी घाबरलो नाही आहे, हे दाखवण्यासाठी बहुदा , अधून मधून कुरापती काढतच होता.
पण आज मोठ्याच्या कुटुंबाने बाळसे धरले आहे. पाठीचा कणा सरळ झाला आहे. मान ताठ झाली आहे. समाजात इभ्रत वाढली आहे. धाकट्याने आणि त्याच्या कबिल्याने आता जरा सबुरीने घ्यावे.... नाहीतर रामाची वानरसेना आता अख्खा शामियानाच घरी घेऊन येतील.
जय श्रीराम !!
कळावे, लोभ असावा
- ॲड स्वाती आवटी दीक्षित
( ता.क. हा फक्त आणि फक्त दोन भावांच्या भांडणाबद्दल लिहिलेला लेख आहे, भावांच्या जागी बहिणी असेही वाचू शकतात पण देश नाही)
No comments:
Post a Comment