ती मोठी झाली...
माझ्यापेक्षाही ??
अचानक शाळेतून फोन येतो 'परीक्षा तात्पुरत्या रद्द झाल्या आहेत, मुलीला घरी घेऊन जा' आणि सुरु होतो तीच्या आणि माझ्या मैत्रीचा प्रवास. तसे आम्ही एकमेकींना गेली 14 वर्षे ओळखतो पण इतके दिवस एकाने सांगायचे म्हणजे मी आणि एकाने ऐकायचे(?) म्हणजे तीने. एकाने वळण लावायचे आणि एकाने वळणावळणाने त्या वळणाला कल्टी मारायची, एकाने पसारा अवरायचा एकाने जमेल तितका अजून पसरवायचा, एकाने अभ्यास घ्यायचा एकाने पूर्णपणे दुर्लक्ष करायचे, एकाने गरम गरम ताट वाढावे एकाने गारगोट्या करून मगच संपवावे. एकाने रागवावे एकाने फारसे मनावर न घेता सुळकन सुटून जावे.
अनेकवर्षं शत्रुराष्ट्रात छोट्या मोठ्या चकमकींच्या फैरी नित्याचीच बाब. एकाला वाटे 'जाहिरातीतल्या सारखी आई हवी' एकीला वाटे 'मुलगी आहे की भूत?'. सततचा (वि)संवाद , वादविवाद , प्रतिवाद, धावा, बचाव आलटून पालटून चालूच. तसा अधून मधून सुसंवादाच्या तुषारांचा थंड शिडकावा होत असे, निमित्त खरेदी, चित्रपट, मॉल, दुर्गा चे लिंबू सरबत, सालसा क्लास, पाणीपुरी, हापूस, श्रीरामपुर आज्जी, दादा, इ. चौदा(१४) वर्षे भागीले ही सगळी निमित्त गुणिले चौदा/पंधरा (14/15) = - शून्य(-०). एकमेकांकडे सतत संशयाने बघायचे आणि कोण आधी वार करतो किंवा कोण कोणापासून काय आणि कसे लपवतो किंवा लपवावे चा विचार फक्त, शांतता करार केलेल्या शत्रूराष्ट्रांसारखे चालायचे.
सुट्टी मिळाली , मुख्य म्हणजे दोघींनाही. एरवी तीचा वेळ स्वतःसाठी, त्यानंतर उरलेल्या वेळेच्या नव्वद टक्के (९०%) दादा साठी, थोडाफार (वसुलीपुरता) बाबा साठी आणि मारून मुटकून कसाबसा दोन टक्के (२%) CSR द्यावा तसा माझ्यासाठी अशी वाटणी असायची. त्या दोन टक्क्यात (२%) जसे आणि जितके जमेल तसे संस्कार-शिबीर आणि स्वाध्यायमाला घेण्याकडे माझा कल, मैत्रीचे बीज कुठे रुजणार आणि कसे अंकुरणार ??
ही सुट्टी मात्र ह्या सर्व टक्केवारीला अपवाद ठरली. अचानक सुट्टी जाहीर झाल्याने दादा त्याच्या हॉस्टेलहून घरी परत येऊ शकला नाही. बाहेरच्या जगाला पण सुट्टी असल्याने वसुली काय आणि कशाची करणार ?? स्वतःला वेळ द्यावा तर मैत्रिणींना पण कुलूप लागलेले. सगळ्यांचेच पाय घरात बांधले गेले. दोन (२) दिवस रागरंग पाहून 'नाईलाज को क्या इलाज' म्हणत शेवटच्या एकमेव उरल्या सुरल्या पर्यायाशिवाय मार्गच राहीला नाही असे लक्षात आल्यावर दोन्ही आघाड्यांनी शस्त्रास्त्रे म्यान केली...... आणि न भूतो न भविष्यती 'नव्या आघाडीचा' उदय झाला.
अगदीच नाही तरी सुरुवातीला कधी खुरपी काढ, कधी वाघनखे उगाच बाहेर काढून दाखव, तलवारीला धार करून ठेव, पिस्तुलीत बार असल्याचे जाहीर कर अशी सर्व नाटकं करून झाल्यावर सरतेशेवटी दात आणि नख पण काढून ठेवली गेली. त्यातच ऑनलाइन शाळा सुरू झाली. सकाळ पासून जे लॉगिन घाई सुरू होई ती दिवसभर चाले. शाळे नंतर व्यक्तिमत्व विकास आणि वैदिक गणित एक बाजू अडकवून ठेवत असत. त्यात घरचा-अभ्यासाची भर पडली. एकमेकांच्या मदती शिवाय गाडी पुढे हलेना. अभ्यास, शाळा,इ मधून बदल म्हणून घरातील छोटी छोटी कामे, स्वयंपाकघरात लुडबुड वाढली. ह्या सगळ्या पळापळीत एकमेकांना टाळी देऊन खोखो, खिखी, ह्याह्या, हुहू कधी सुरू झालं कळालंच नाही. तसे गणित/मराठी सारखे एका पक्षाचे मित्र आणि दुसऱ्या पक्षाचे शत्रू दोन्ही पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करायचे पण आता दोघीही कोणाला दाद देणार नव्हत्या. दोन्हीही पक्ष समसमान पातळीवर आले होते. तीने लिहावे, हिला वाचून दाखवावे. हिने चित्र काढावे , तीला दाखवावे, एकत्र दूरचित्रवाणी वर चित्रपट पहावे, एखाद्या दृश्यावर एकमेकांकडे फक्त कटाक्ष टाकून कारंजी आणि/किंवा धबधब्यांची बरसात व्हावी. आता बोलण्याची पण गरज राहिली नव्हती. आँखो ही आंखोंमे गुजगोष्टी होऊ लागल्या. खेळीमेळीचा अर्थ वागण्यातून समजला आणि समजावला जात होता. अशाच एका बेसावध क्षणी हिने तीला 'स्टँड-अप कॉमेडी' बघायला आमंत्रित केले. ती बावरली 'अंग हे काय बघतेस, त्यातले विनोद कसले असतात?' ... ती, ' chill bro, this show is non age restricted (ह्या शो ला वयाचा काही निर्बंध नाही) ... तू बघू शकतेस'.
ती गार ......
कळावे, लोभ असावा
- ॲड. स्वाती आवटी दीक्षित
माझ्यापेक्षाही ??
अचानक शाळेतून फोन येतो 'परीक्षा तात्पुरत्या रद्द झाल्या आहेत, मुलीला घरी घेऊन जा' आणि सुरु होतो तीच्या आणि माझ्या मैत्रीचा प्रवास. तसे आम्ही एकमेकींना गेली 14 वर्षे ओळखतो पण इतके दिवस एकाने सांगायचे म्हणजे मी आणि एकाने ऐकायचे(?) म्हणजे तीने. एकाने वळण लावायचे आणि एकाने वळणावळणाने त्या वळणाला कल्टी मारायची, एकाने पसारा अवरायचा एकाने जमेल तितका अजून पसरवायचा, एकाने अभ्यास घ्यायचा एकाने पूर्णपणे दुर्लक्ष करायचे, एकाने गरम गरम ताट वाढावे एकाने गारगोट्या करून मगच संपवावे. एकाने रागवावे एकाने फारसे मनावर न घेता सुळकन सुटून जावे.
अनेकवर्षं शत्रुराष्ट्रात छोट्या मोठ्या चकमकींच्या फैरी नित्याचीच बाब. एकाला वाटे 'जाहिरातीतल्या सारखी आई हवी' एकीला वाटे 'मुलगी आहे की भूत?'. सततचा (वि)संवाद , वादविवाद , प्रतिवाद, धावा, बचाव आलटून पालटून चालूच. तसा अधून मधून सुसंवादाच्या तुषारांचा थंड शिडकावा होत असे, निमित्त खरेदी, चित्रपट, मॉल, दुर्गा चे लिंबू सरबत, सालसा क्लास, पाणीपुरी, हापूस, श्रीरामपुर आज्जी, दादा, इ. चौदा(१४) वर्षे भागीले ही सगळी निमित्त गुणिले चौदा/पंधरा (14/15) = - शून्य(-०). एकमेकांकडे सतत संशयाने बघायचे आणि कोण आधी वार करतो किंवा कोण कोणापासून काय आणि कसे लपवतो किंवा लपवावे चा विचार फक्त, शांतता करार केलेल्या शत्रूराष्ट्रांसारखे चालायचे.
सुट्टी मिळाली , मुख्य म्हणजे दोघींनाही. एरवी तीचा वेळ स्वतःसाठी, त्यानंतर उरलेल्या वेळेच्या नव्वद टक्के (९०%) दादा साठी, थोडाफार (वसुलीपुरता) बाबा साठी आणि मारून मुटकून कसाबसा दोन टक्के (२%) CSR द्यावा तसा माझ्यासाठी अशी वाटणी असायची. त्या दोन टक्क्यात (२%) जसे आणि जितके जमेल तसे संस्कार-शिबीर आणि स्वाध्यायमाला घेण्याकडे माझा कल, मैत्रीचे बीज कुठे रुजणार आणि कसे अंकुरणार ??
ही सुट्टी मात्र ह्या सर्व टक्केवारीला अपवाद ठरली. अचानक सुट्टी जाहीर झाल्याने दादा त्याच्या हॉस्टेलहून घरी परत येऊ शकला नाही. बाहेरच्या जगाला पण सुट्टी असल्याने वसुली काय आणि कशाची करणार ?? स्वतःला वेळ द्यावा तर मैत्रिणींना पण कुलूप लागलेले. सगळ्यांचेच पाय घरात बांधले गेले. दोन (२) दिवस रागरंग पाहून 'नाईलाज को क्या इलाज' म्हणत शेवटच्या एकमेव उरल्या सुरल्या पर्यायाशिवाय मार्गच राहीला नाही असे लक्षात आल्यावर दोन्ही आघाड्यांनी शस्त्रास्त्रे म्यान केली...... आणि न भूतो न भविष्यती 'नव्या आघाडीचा' उदय झाला.
अगदीच नाही तरी सुरुवातीला कधी खुरपी काढ, कधी वाघनखे उगाच बाहेर काढून दाखव, तलवारीला धार करून ठेव, पिस्तुलीत बार असल्याचे जाहीर कर अशी सर्व नाटकं करून झाल्यावर सरतेशेवटी दात आणि नख पण काढून ठेवली गेली. त्यातच ऑनलाइन शाळा सुरू झाली. सकाळ पासून जे लॉगिन घाई सुरू होई ती दिवसभर चाले. शाळे नंतर व्यक्तिमत्व विकास आणि वैदिक गणित एक बाजू अडकवून ठेवत असत. त्यात घरचा-अभ्यासाची भर पडली. एकमेकांच्या मदती शिवाय गाडी पुढे हलेना. अभ्यास, शाळा,इ मधून बदल म्हणून घरातील छोटी छोटी कामे, स्वयंपाकघरात लुडबुड वाढली. ह्या सगळ्या पळापळीत एकमेकांना टाळी देऊन खोखो, खिखी, ह्याह्या, हुहू कधी सुरू झालं कळालंच नाही. तसे गणित/मराठी सारखे एका पक्षाचे मित्र आणि दुसऱ्या पक्षाचे शत्रू दोन्ही पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करायचे पण आता दोघीही कोणाला दाद देणार नव्हत्या. दोन्हीही पक्ष समसमान पातळीवर आले होते. तीने लिहावे, हिला वाचून दाखवावे. हिने चित्र काढावे , तीला दाखवावे, एकत्र दूरचित्रवाणी वर चित्रपट पहावे, एखाद्या दृश्यावर एकमेकांकडे फक्त कटाक्ष टाकून कारंजी आणि/किंवा धबधब्यांची बरसात व्हावी. आता बोलण्याची पण गरज राहिली नव्हती. आँखो ही आंखोंमे गुजगोष्टी होऊ लागल्या. खेळीमेळीचा अर्थ वागण्यातून समजला आणि समजावला जात होता. अशाच एका बेसावध क्षणी हिने तीला 'स्टँड-अप कॉमेडी' बघायला आमंत्रित केले. ती बावरली 'अंग हे काय बघतेस, त्यातले विनोद कसले असतात?' ... ती, ' chill bro, this show is non age restricted (ह्या शो ला वयाचा काही निर्बंध नाही) ... तू बघू शकतेस'.
ती गार ......
कळावे, लोभ असावा
- ॲड. स्वाती आवटी दीक्षित
No comments:
Post a Comment